![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/05/fgbcfgbfctgbdfvbdtg_202005417592.jpg?resize=880%2C528&ssl=1)
| नवी दिल्ली | देशात गेल्या चोवीस तासांमध्ये १५ हजारांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता ४ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. कोरोनामुळे देशात गेल्या चोवीस तासात ३०६ जणांचा बळी गेला. त्यामुळे या आजाराने मरण पावलेल्यांची एकूण संख्या आता १३ हजारांहून अधिक झाली आहे.
देशामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून त्यानंतर तामिळनाडूमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. गेल्या चोवीस तासात तामिळनाडूमध्ये कोरोनाचे २३९६ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे तेथील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५६ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. सध्या देशात १,६९,४५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पूर्णपणे बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या २,२७,७५६ आहे. एकूण रुग्णांपैकी ५५ टक्के लोक या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
- सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा
- लोकसभा निवडणुकीत मतदानात होतेय हेराफेरी ? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं सत्य
- कंपनी असावी तर अशी… IT कंपनीने बाजारपेठेत उडवली खळबळ, लाभांशाची करणार लयलूट
- मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका
- वसुली करणाऱ्यांना वसुली सोडून तसेही दुसरे काही सुचते असे नाहीच.