
| पुणे | जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा ३३५ वा पालखी प्रस्थान सोहळा यंदा कोरोनाच्या सावटाखाली साजरा होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदा पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. मात्र सर्व प्रथा परंपरांचे पालन केलं जात आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह तहसीलदार आणि मानाच्या ५० वारक-यांच्या उपस्थितीत काल या सोहळ्याला सुरुवात झाली. सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचं पालन करत वारक-यांनी टाळ मृदुगांचा तालावर ठेका धरला. मोजक्याच वारक-यांसोबत ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात देहूनगरी दुमदुमली. मोजके वारी विवेकाची पताका खांद्यावर घेत, वारीची परंपरा जपताना दिसत आहेत.
दरवर्षी इंद्रायणीचा काठ हा लाखो वारक-यांनी गजबलेला असतो. इंद्रायणीत स्नान करत विठूनामाच्या जयघोषात तल्लीन होत असतात. पण वारक-यांनी गजबलेला इंद्रायणीचा घाट यंदा शांत आहे. कोरोनाच्या सावटामुळे पायी वारी सोहळा होणार नसल्यानं वारक-यांच्या मनात दु:ख आहे. मात्र, वारकरी संप्रदाय हा कायम विवेकाची कास जोपासत आला आहे. त्यामुळं यंदा सगुण वारकरी करण्याऐवजी वारक-यांनी निर्गुण वारी करत एक झाड लावून पर्यावरण रक्षण करावं, असं आवाहन सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे यांनी केलं आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री