शेतकऱ्यांना कर्ज द्या, नाहीतर बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार..!

| मुंबई | सध्या शेतक-यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कजार्ची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका शेतक-यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून ज्या बँका शेतक-यांना पीक कर्ज देणार नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

शेतक-यांना सुलभतेने कर्ज मिळावे यासाठी राज्य शासन आग्रही आहे. यासाठी राज्य शासनाच्या वतीने देखील विशेष आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. असे असतानाही अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतक-यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी या प्राप्त होत आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे.

ज्या बँका पीक कर्ज देत नाही त्यांना वारंवार सूचना सुद्धा करण्यात येत आहे. शेतक-यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे अशा बँकांची तक्रार जिल्हाधिकारी यांनी दिली तर अडचणीच्या काळात शेतक-यांची पिळवणूक करणा-या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *