शरद पवार यांच्या पाठिंब्यावर वाधवान कुटुंबाला पत्र..!
माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आरोप..


मुंबई : शरद पवारांच्या पाठिंब्याशिवाय वाधवान कुटुंबाला गृह सचिवांकडून परवानगी पत्र मिळणं अशक्य असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. वाधवान प्रकरणावर किरीट सोमय्या यांचा पवार परिवारावर घणाघात केला आहे. शरद पवार आणि वाधवान कुटुंबियांचे घरगुती संबंध असल्याचं जगजाहीर आहे, असा दावा देखील सोमय्या यांनी केला आहे.

पवारांच्या पाठिंब्याशिवाय गृह सचिवांकडून विशेष परवानगी पत्र मिळणं अशक्य आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणानंतर केंद्राने वाधवान कुटुंबियांची कस्टडी मागितली असता सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या विलगीकरणाचं कारण देऊन टोलवाटोलवीचा प्रयत्न केला आहे, असा आरोप देखील सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्या गृह सचिव यांच्याविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणार आहेत. या प्रकरणात गृहमंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *