![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/05/images-50-2020-05-08T131548.875.jpeg?resize=678%2C452&ssl=1)
| नवी दिल्ली | देशात सामान्य रेल्वे सेवा सध्या तरी सुरु करण्यात येणार नाही. रेल्वेने ३० जून किंवा त्याआधी प्रवास करण्यासाठी बुक केलेली सर्व तिकीटं कॅन्सल केली आहेत. ३० जूनपर्यंत बुक करण्यात आलेल्या सर्व प्रवाशांच्या तिकीटाचे पैसे रिफंड करण्यात येणार आहेत. दरम्यान, सर्व स्पेशल ट्रेन्स आणि श्रमिक स्पेशल ट्रेन्स आपल्या नियोजित वेळेनुसार सुरु राहणार आहेत.
रेल्वने याआधी १७ मेपर्यंत रेल्वेची तिकीटं कॅन्सल केली होती. आता रेल्वेने ३० जूनपर्यंत सर्व तिकीटं कॅन्सल करणार असल्याची घोषणा केली आहे. देशात लॉकडाऊन सुरु असून या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपणार आहे. १२ मे रोजी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा चौथा टप्पा १७ मे नंतर सुरु होणार असल्याचं सांगितलं होतं. १८ मेपासून देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु होणार आहे. दरम्यान पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनआधी बुक करण्यात आलेली ९४ लाख तिकीटं रेल्वेने कॅन्सल केली असून १४९० कोटी रूपये ग्राहकांना परत केले आहेत.
सरकारने कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी सामान्य रेल्वे सेवा बंद केल्या आहेत. परंतु, सर्व स्पेशल आणि श्रमिक स्पेशल ट्रेन्स सुरु राहणार आहेत. रेल्वेच्या आदेशात सांगण्यात आलं की, ‘एक मेपासून सुरु करण्यात आलेल्या श्रमिक ट्रेन सेवा आणि १२ मेपासून सुरु करण्यात आलेल्या विशेष ट्रेन सुरु राहणार आहेत.’
- सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा
- लोकसभा निवडणुकीत मतदानात होतेय हेराफेरी ? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं सत्य
- कंपनी असावी तर अशी… IT कंपनीने बाजारपेठेत उडवली खळबळ, लाभांशाची करणार लयलूट
- मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका
- वसुली करणाऱ्यांना वसुली सोडून तसेही दुसरे काही सुचते असे नाहीच.
- निंबाळकर VS मोहिते पाटील; माढा मतदारसंघात कोणाचे वर्चस्व, कोणाकडे किती संपत्ती ?