
| •मुंबई/क्रीडा प्रतिनिधी• | सप्टेंबरमध्ये हाेणारी आशिया कप स्पर्धा रद्द झाल्याची घोषणा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने केली. यंदा पाकिस्तानकडे या स्पर्धेचे यजमानपद होते. मात्र, भारताने कोरोना प्रादुर्भावामुळे आपत्ती व्यक्त केल्यानंतर यूएईमध्ये त्याच्या आयोजनाची चर्चा होती. परंतु ती रद्द करण्यात आली आहे; स्पर्धा रद्द रद्द होण्यामागचे कारण मात्र त्यांनी सांगितले नाही. मात्र, पीसीबीचे अध्यक्ष एहसान मनीने म्हटले की, आम्हाला आशियाई क्रिकेट संघटनेकडून काहीही सांगण्यात आलेले नाही.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या मते, प्रत्येक मालिकेत एक दिवस-रात्र कसोटीचे आयोजन करावे. अशा क्रिकेटमुळे कसोटीची लोकप्रियता वाढेल. ज्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षक स्टेडियममध्ये बसून सामना पाहण्यासाठी आकर्षित होतील. गांगुलीने म्हटले की, देशात आयपीएलचे आयोजन करण्याची आमची प्राथमिकता आहे. श्रीलंका, यूएई, न्यूझीलंडने या टी-२० लीगच्या आयोजनासाठी प्रस्ताव दिला आहे. आयपीएल विदेशात होईल, या गोष्टीचे गांगुलीने खंडन केले.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री