औरंगाबाद घटनेवर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त..!



| औरंगाबाद | मध्यप्रदेशात जाण्यासाठी जालन्यातील स्टील उद्योगात काम करणाऱ्या कामगारांनी पायी चालत जाण्याचा निर्णय रात्री घेतला. करमाडपर्यंत आल्यानंतर थकल्यामुळे ते रुळावर झोपले. यावेळी जालनाकडून येणाऱ्या मालवाहतूक रेल्वेखाली सापडल्यामुळे १६ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या धक्कादायक घटनेवर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेस नेते राहुल गांधी आदी यांनी ट्वीट करत मृत मजुरांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने मजुरांना जीव धोक्यात घालून घरी जाण्याची घाई करू नये त्यांची सोय करण्यात आली आहे असे आवाहन केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *