
| जालना | नाफेड अंतर्गत नानसी धान्य अधिकोष संस्थे मार्फत होत असलेली हरभरा पिकाची खरेदी (ता.24) सोमवार पर्यंत सुरू राहणार असून ज्या शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची ऑनलाइन नोंदणी केली आहे. अशा शेतकऱ्यांनी आपले हरभरा पिक खरेदी केंद्रावर विक्रीसाठी घेऊन यावा.
नानसी धान्य अधिकोष संस्थे मार्फत ऑनलाइन करण्यात आलेल्या 475 शेतकऱ्यांपैकी 230 शेतकऱ्यांनी आपला माल खरेदी केंद्रावर विक्री केला असून 3295 कुंटल हरभरा पिकाची खरेदी करण्यात आली आहे. तसेच पहिल्या टप्प्यातील खरेदी करण्यात आलेल्या हरभरा पिकाचे पैसे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ यांनी दिली.
उर्वरित ऑनलाईन केलेल्या 245 शेतकऱ्यांनी आपला हरभरा शेतीमाल नानसी पुनर्वसन येथील शासकीय खरेदी केंद्रावर (ता.24) सोमवार पर्यंत घेऊन यावा. खरेदी ची तारीख कुठल्याही कारणास्तव वाढवण्यात येणार नसल्याने खरेदी केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार असल्याने शेतकर्यांनी खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन माऊली अर्बन को-ऑपरेटिव पतसंस्थेचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती मंठा चे संचालक सतीशराव निर्वळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री