
| नवी दिल्ली | केंद्रातील मोदी सरकारने देशातील सर्वसामान्यांना मोठा दणका दिला आहे.
मोदी सरकारने नैसर्गिक वायूच्या (Natural Gas) किमतीमध्ये तब्बल 62 टक्क्यांनी वाढ (hikes) केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या समस्या वाढणार आहेत. नैसर्गिक वायूचा (Natural Gas) वापर खतं, वीज उत्पादन आणि सीएनजी (CNG) वायू तयार करणासाठी केला जातो. त्यामुळे सीएनजी, पीएनजी (PNG) आणि खतांच्या (fertilizers) किमतीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
ओएनजीसी (ONGC) सारख्या सरकारी कंपन्या उत्पादन घेत असलेल्या नैसर्गिक वायूची (Natural Gas) किंमत 1 ऑक्टोबरपासून 2.90 डॉलर प्रति 10 लाख ब्रिटिश थर्मल युनिट (British Thermal Unit) एवढी असेल. यापूर्वी ही किंमत 1.79 डॉलर एवढी होती. परंतु आता नवा दर लागू होणार असून पुढील सहा महिन्यांसाठी हाच दर कायम असेल.
समुद्रातून काढण्यात येणाऱ्या वायूचा दर 6.13 डॉलर प्रति 10 लाख ब्रिटिश थर्मल युनिट इतका असेल. यासाठीचं नोटिफिकेशन (Notification) सरकारकडून जारी करण्यात आले आहे.
नैसर्गिक वायूच्या दरात भरभक्कम वाढ झाल्याने मुंबई (Mumbai), दिल्ली (Delhi) सारख्या मोठ्या शहरांमध्ये सीएनजी आणि पाईप गॅसच्या दरात 10 ते 11 टक्क्यांनी वाढ होईल.
अशी माहिती उद्योग जगतातील सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.
वीज उत्पादनासाठी देखील नैसर्गिक वायूचा वापर होतो. परंतु याचा फारसा फटका ग्राहकांना बसणार नाही. नैसर्गिक वायूच्या मदतीनं तयार होणाऱ्या विजेचं प्रमाण कमी असल्याने ग्राहकांच्या खिशावर बोजा पडणार नाही. मात्र, खतांच्या उत्पादनासाठी येणारा खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम खतांच्या किमती वर होईल.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री