![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/05/download-2020-05-23T221450.209.jpeg?resize=300%2C168&ssl=1)
| मुंबई | कोरोनाबाबत चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाली. कोरोनाच्या संकटावर मात कशी करायची आणि कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक झाली. तसेच पुढील कालावधीत लॉकडाऊन ठेवायचे की नाही, याबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये ही बैठक झाली. बैठकीला जयंत पाटील, संजय राऊत, राज्याचे सचिव अजोय मेहता उपस्थित होते.राज्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. कोरोनाची साखळी वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, कोरोनावरुन विरोधकांकडून राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप सत्ताधा-यांकडून करण्यात आला आहे. कोरोनाची स्थिती दिवसागणिक वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यात बैठक झाली. कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालल्याने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आता मैदानात उतरले आहेत. त्यामुळे ते काय मार्गदर्शन करतात, याचीही उत्सुकता आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईची लोकल चालू करण्याबाबत देखील चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
- सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा
- लोकसभा निवडणुकीत मतदानात होतेय हेराफेरी ? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं सत्य
- कंपनी असावी तर अशी… IT कंपनीने बाजारपेठेत उडवली खळबळ, लाभांशाची करणार लयलूट
- मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका