
| मुंबई | आज दिवसभरात राज्यात 11 हजार 88 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर 24 तासात 256 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असून आज महाराष्ट्रात 10 हजार 14 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 35 हजार 601 इतकी झाली आहे. त्यापैकी एकूण 3 लाख 68 हजार 435 कोरोनाग्रस्त बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण-रिकव्हरी रेट 68.79 टक्के एवढा झाला आहे.
सध्या राज्यात 1 लाख 48 हजार 553 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 18 हजार 306 जणांचा बळी गेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.42 टक्के इतका आहे.
सध्या राज्यात 10 लाख 4 हजार 233 जण होम क्वारंटाईनमध्ये असून 35 हजार 648 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आतापर्यंत 28 लाखांहून अधिक चाचण्या झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री