| बुलढाणा | सत्ताधारी भाजप सरकारने केंद्रामध्ये शेती आणि शेतकरी यांना उध्वस्त करणारे विधेयक संसदेत मंजूर करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे पुढील काळात शेतकऱ्यांची भांडवलदारा कडून मोठ्या प्रमाणात लूट होणार आहे. या विधेयकावर रणकंदन सुरू आहे. कुठल्याही चर्चेशिवाय ही विधेयक गोंधळात मंजूर करण्यात आली. त्यामुळे केंद्र सरकारवर सगळीकडून टीका होत आहे.
सदर विधेयकाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांनसाठी काही नवीन करत असल्याची केंद्र सरकारची भूमिका आहे. परंतु निर्बंध काढून टाकल्याने एक प्रकारे मक्तेदारी निर्माण होणार आहे. त्यामुळे तीनही विधेयक केंद्रसरकारने संख्याबळावर रेटून धरून मंजूर करून घेतली. खरंतर हमीभाव आणि स्वामिनाथन आयोग महत्वाचा आहे. त्यामुळे स्वामिनाथन आयोग लागू करण्याचा निर्णय घ्यावा असे मत जिजाऊ क्रांती सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अंबादास गावंडे व्यक्त केले आहे.
- सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा
- लोकसभा निवडणुकीत मतदानात होतेय हेराफेरी ? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं सत्य
- कंपनी असावी तर अशी… IT कंपनीने बाजारपेठेत उडवली खळबळ, लाभांशाची करणार लयलूट
- मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका
- वसुली करणाऱ्यांना वसुली सोडून तसेही दुसरे काही सुचते असे नाहीच.