कायदे नकोत, सरळसरळ स्वामिनाथन आयोग लागू करा – अंबादास गावंडे

| बुलढाणा | सत्ताधारी भाजप सरकारने केंद्रामध्ये शेती आणि शेतकरी यांना उध्वस्त करणारे विधेयक संसदेत मंजूर करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे पुढील काळात शेतकऱ्यांची भांडवलदारा कडून मोठ्या प्रमाणात लूट होणार आहे. या विधेयकावर रणकंदन सुरू आहे. कुठल्याही चर्चेशिवाय ही विधेयक गोंधळात मंजूर करण्यात आली. त्यामुळे केंद्र सरकारवर सगळीकडून टीका होत आहे.

सदर विधेयकाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांनसाठी काही नवीन करत असल्याची केंद्र सरकारची भूमिका आहे. परंतु निर्बंध काढून टाकल्याने एक प्रकारे मक्तेदारी निर्माण होणार आहे. त्यामुळे तीनही विधेयक केंद्रसरकारने संख्याबळावर रेटून धरून मंजूर करून घेतली. खरंतर हमीभाव आणि स्वामिनाथन आयोग महत्वाचा आहे. त्यामुळे स्वामिनाथन आयोग लागू करण्याचा निर्णय घ्यावा असे मत जिजाऊ क्रांती सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अंबादास गावंडे व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *