
| मुंबई | राज्यात योग्य ती खबरदारी घेत जुलै महिन्यापासून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याची शालेय शिक्षण विभागाची तयारी आहे. शाळा कशा सुरू करता येतील यासाठी शिक्षण विभागाने मार्गदर्शक तत्वे देखील तयार केली आहेत. मात्र १५ जूनपासून शाळेत शिक्षकांच्या उपस्थितीबद्दल शिक्षण अधिकाऱ्यांचाच गोंधळ पाहायला मिळत आहे. या संदर्भात शिक्षण संचालकांना मार्गदर्शन करण्याचे पत्र शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहे.
मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी कार्यालयाचा गोंधळ उडाला असून आधी शिक्षकांनी उपस्थित रहा असे फर्मान त्यांनी काढले होते आणि आता उपस्थित राहायचे की नाही याचे मार्गदर्शन शिक्षण संचालकांकडे मागत आहेत. शिक्षकांना शाळेत उपस्थित राहावे यासाठी १० जून रोजी पत्रक काढले गेले. त्यानंतर अनेक शिक्षकांनी याला विरोध दर्शवत शाळा सुरू नसताना शिक्षकांना का बोलवले जात आहे ? रेल्वे, लोकलसेवा सुरू नसताना शिक्षक कसे उपस्थित राहणार ? असे प्रश्न उपस्थित करत विरोध दर्शविला होता .
याआधी जे परिपत्रक निघाले त्यात शिक्षकेतर कर्मचारी आणि पेपर तपासणीसाठी शिक्षकांना शाळेत येण्यास सांगितले गेले होते. त्यामुळे १५ जून पासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या उपस्थिती बाबत शिक्षण संचालकाकडे मार्गदर्शन करावे याबाबत बीएमसी शिक्षण अधिकारी यांनी पत्र दिले आहे.
दरम्यान अनेक शिक्षक गावी तर बहुतांशी शिक्षक ठाणे, नवी मुंबई, पालघर व रायगड जिल्ह्यात राहतात. लोकल मेट्रो व वाहतुकीची सगळी साधने बंद असल्याने शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करू द्यावे, अशी मागणी मुंबई, ठाण्यातील शिक्षक संघटनांची आहे, जी व्यवहार्य आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री