
| कोलंबो | शेजारचा देश श्रीलंकेने भारताला मोठा धक्का दिला आहे. रणनीतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असणारा इस्टर्न कंटेनर टर्मिनल प्रकल्प श्रीलंकेच्या सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदी महासागरात चीनला शह देण्यासाठी भारतासाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा होता. मात्र, देशातंर्गत सुरू असलेल्या विरोधामुळे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी हा प्रकल्प रद्द केला आहे.
इस्टर्न कंटनेर टर्मिनल प्रकल्प श्रीलंका, भारत आणि जपान संयुक्तपणे राबवणार होते. सिरीसेना यांच्या सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. ईसीटी प्रकल्प हा ५० कोटी अमेरिकन डॉलरचा असून कोलंबो इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनलजवळ आहे. या प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर दोन वर्षापूर्वीच स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. या करारानुसार भारत आणि जपानकडे या बंदराची ४९ टक्के आणि श्रीलंका बंदर प्राधिकरणाकडे ५१ टक्के भागिदारी राहणार होती. आता श्रीलंकेने हा प्रकल्प रद्द केला असून भारत आणि जपानसोबत वेस्टर्न कंटेनर टर्मिनल उभारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कामगार संघटनांचा विरोध
भारत आणि जपानसोबतच्या या कराराला बंदर कामगार संघटनांनी विरोध केला होता. जवळपास २३ कामगार संघटना या कराराविरोधात होत्या. या ECT प्रकल्पावर पूर्णपणे श्रीलंका बंदर प्राधिकरणाचा अधिकार असावा अशी मागणी करण्यात आली होती. भारताच्या अदानी समूहासोबत करण्यात आलेला हा करार योग्य नसल्याचा आक्षेप कामगार संघटनांनी केला. कराराला विरोध करणाऱ्या बहुतांशी संघटना या सत्तारुढ पक्षाशी संबंधित आहेत.
श्रीलंकेचे भारतविरोधी पाऊल?
भारताच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. चीनचा श्रीलंकेमध्ये हस्तक्षेप वाढला आहे. श्रीलंकेतील एक बंदर चीनने ९९ वर्षांसाठी भाडेतत्वावर घेतले आहे. हे बंदर सामरीकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. चीनला शह देण्यासाठी भारतानेदेखील श्रीलंकेतील बंदराच्या विकासासाठी पुढाकार घेतला असल्याची चर्चा होती. श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती सिरीसेना यांनी चीनपेक्षा भारताला प्राधान्य दिले होते. त्यांच्याच कार्यकाळात श्रीलंका, भारत आणि जपान यांच्या भागिदारीत इस्टर्न कंटनेर टर्मिनल प्रकल्प सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री