
| कल्याण | संपूर्ण राज्यात कोरोना (कोविड १९) चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामध्येच मागील आठवड्यात परतीचा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सध्या भातशेतीचे व इतर धान्याचे काढणीचे काम सुरु होते. मात्र पावसाने काढणीच्या कामात व्यत्यय येत असून पिकांचे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने काढणी केलेले पिक, भाजीपाला, भातशेती व इत्यादी धान्यांना फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने ठाणे, कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. त्याचाच आढावा घेऊन शेतीचे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दि.२० ऑक्टोंबर २०२० रोजी बाधीत क्षेत्राचा दौरा केला.
सदर दौऱ्यादरम्यान खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी शिरढोण, बाळेगाव, वाकळण, दहिसर मोरी, मलंगवाडी, कुशिवली, आंबे, ढोके, खरड, मांगरूळ, नेवाळीपाडा आदी ग्रामीण भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांचे व्यथा जाणून घेतल्या व झालेल्या शेतीचे पंचनामे लवकरात लवकर करण्याचे तातडीचे आदेश त्यांनी दिले.
शेतकरी हातातोडांशी आलेला घास हिरवला कि काय या चिंतेत होते, परंतु ज्या- ज्या शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहेत, त्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देऊ असे ठाम आश्वासन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सर्व शेतकऱ्यांना पाहणी दौऱ्यादरम्यान दिले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह संबधित शासकीय अधिकारी, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, नेवाळी सरपंच चैनु जाधव, जिल्हापरिषद सदस्य रमेश पाटील, नगरसेवक रमाकांत मढवी, महेश गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री